शुक्रवार, २६ जून, २०२०

कोणत्याही जाहिराती नसताना व्हॉट्सॲपचे मिळकतीचे नक्की मार्ग कोणते आहेत?

2009 साली Brian Acton and Jan Coum या दोन व्यक्तींनी ही कंपनी सुरू केली.

Photo - WhatsApp

यांचा उद्देश होता कोणत्याही प्रकारे माहितीची देवाण घेवाण जसे की मेसेज, फोटो, विडिओ, कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लगेच इच्छित व्यक्तिपर्यंत पोहोचावी ते ही अगदी फ्री आणि जाहिराती विना. त्या व्यक्तीनां जाहिरांतीची खूप चीड होती. म्हणून त्यांनी असे विना जाहिरांतीचे अँप्लिकेशन बनवले.

जेव्हा हे अँप्लिकेशन सुरू झाले तेव्हा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आणि खूप लोकांनी याला डाउनलोड केले.

WhatsApp च्या मिळकतीचा/उत्पन्नाचा मुद्दा

आधी जेव्हा हे अँप्लिकेशन नव्याने चालू झाले तेव्हा काही देशात ते अगदी फ्री होते. मग याचा वाढता वापर बघून डाउनलोड साठी काही देशात हे $ 1 असे चार्जेस ठेवण्यात आले कारण रोज होणाऱ्या डेटाचा वापर हा खूप जास्त होऊ लागला आणि कंपनीची क्षमता कमी पडू लागली. तर काही देशात 1 वर्षानंतर renew करण्यासाठी चार्जेस ठेवले गेले. तर याप्रकारे WhastApp चे उत्त्पन्न होते. आणि येथे काम करणारे कर्मचारी देखील कमी होते, जे 50 होते असं सांगतात. त्यांना जास्त पगार देऊन ठेवले नव्हतं हे ही तितकंच खरं आहे.

Photo - WhatsApp Update 2019 | MessengerPeople

मग आला तो दिवस WhatsApp चा पूर्ण कायापालट नशीब बदलणारा

साल 2014, फेसबुक या अग्रगण्य कंपनीने $ 19 बिलियन किंमतीला याला विकत घेतले. ह्याला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा करार म्हणला जातो. एक वेळ अशीही होती की Brian Acton आणि Jan Coum

यांना फेसबुक ने नोकरी मिळवण्याच्या अर्जात नाकारले होते.

का विकत घेतली फेसबुक ने WhatsApp

हा सौदा झाला तेव्हाच WhatsApp ने काही अटी व शर्ती यासहित शिक्कामोर्तब केले. त्यात ही एक अट होतीच की पूर्वी प्रमाणे यामध्ये जाहिराती दाखवता येणार नाहीत.

मग WhatsApp असे करणार तरी काय ज्याचे फेसबुकने एवढे पैसे मोजले?

तर WhatsApp त्याच्या Cookies मधील डेटा फेसबुकला देणार ज्याचा फायदा फेसबुक त्याच्या जाहिराती दाखवण्यासाठी करणार.

आता Cookies म्हणजे काय?

Photo - All You Need to Know About Internet Cookies and How to Manage Them

एखाद अँप आपण जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा कोणत्या प्रकारची महिती बघत असतो, आपण त्यावर काय काय करत असतो हे रेकॉर्ड/सेव्ह करून ठेवत असते जेणेकरून त्या अँपच्या कंपनीला त्यांचे अँप अजून कसे उत्कृष्ट, दर्जेदार कसे बनविता येईल हा उद्देश असतो. पण आता हा डेटा व्हाट्सअप्प फेसबुकला देणार.

फेसबुकने ही कंपनी विकत घेतली कारण फेसबुक नंतर सर्वात जास्त वापरकर्ते असतील तर कोणाचे ते WhatsApp चे.

दुसऱ्या प्रकारे WhatsApp चे उत्पन्न म्हणजे हल्लीच WhatsApp ने चालू केलेली WhatsApp For Business सुविधा.

तुम्ही एखादा Business करत असाल आणि ज्याला WhatsApp ची गरज असेल, मदत लागेल तर या माध्यमातून WhatsApp पैसे आकारते.

उदा. माझा फूड डिलिव्हरीचा Business आहे. कस्टमरने WhatsApp करून त्याला जे पाहिजे ते ऑर्डर केल त्यानंतर ती ऑर्डर त्यापर्यंत पोहेचेपर्यंत त्याची अपडेट्स त्याला WhatsApp वर मिळत राहतील.

तर तुम्हाला कळले असेल की एकपण जाहिरात नसूनसुद्धा WhatsApp पैसे कसे कमावते.

तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल…🙏🙏🙏

 

सोमवार, २२ जून, २०२०

संशोधन संस्था

संशोधन संस्था

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च 
(C I S R). विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबत सर्व प्रकारची जबाबदारी असणारे भारत सरकारने स्थापन केलेले स्वायत्त मंडळ.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 
भौतिकी व गणित या विषयांत मूलभूत संशोधन करणारी ही संस्था
भाभा अणुसंशोधन केंद्र 
भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे आद्य प्रणेते
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स 
निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असलेले शास्त्रीय विषयांतील सैद्धांतिक व अनुप्रयुक्त
भारतीय विज्ञान परिषद संस्था 
भारतात विज्ञानाची अभिवृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असलेली व्यापक पायावर उभारलेली भारतीय वैज्ञानिक संस्था.
मराठी विज्ञान परिषद 
मराठी भाषिक जनतेत विज्ञानाचा प्रसार करून समाजास विज्ञानाभिमुख बनवावे व वैज्ञानिकांना समाजाभिमुख करून समाजाचे वैज्ञानिक प्रबोधन साधावे, यांसाठी प्रयत्न करण्याकरिता स्थापण्यात आलेली विज्ञानप्रेमी नागरिकांची संघटना.
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था 
(महाराष्ट्र एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट; MERI). मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी संशोधन करणारी संस्था.
महाराष्ट्र ॲकॅडेमीऑफसायन्सेस 
महाराष्ट्रराज्याचीआर्थिकउन्नती, सामाजिक प्रगती व कल्याण साधण्यासाठी महाराष्ट्रात विज्ञान व तंत्रविद्या यांचे संवर्धन त्यांच्या उपयोजनेसह करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र ॲसोसिएशनफॉरदकल्टिव्हेशनऑफसायन्स 
विज्ञानाच्या विविध शास्त्रांतर्गत संशोधन चालविणारी स्वायत्त व बिनसरकारी संस्था.
युनियन ऑफ इंटरनॅशनल टेक्निकल ॲसोसिएशन्स 
विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा संघ आहे.
राष्ट्रीय प्रयोगशाळा 
भारतातील विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबतची सर्व प्रकारची जबाबदारी असणारे
रॉयल सोसायटी 
ग्रेट ब्रिटनमधील ही सर्वांत जुनी वैज्ञानिक संस्था असून यूरोपातील जुन्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे.
सेर्न 
मूलभूत भौतिकीमध्ये संशोधन करणारी जागतिक दर्जाची संघटना.
स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन 
इंग्रज वैज्ञानिक जेम्स स्मिथसन यांच्या मृत्युपत्रानुसार मिळालेल्या सु. ५,८०,३१,८४६ डॉलर संपत्तीच्या आधारे अमेरिकेत स्थापन झालेली वैज्ञानिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधनासाठी कार्यरत असलेली संस्था
हाफकिन इन्स्टिट्यूट 
विविध रोगांवर लशी निर्माण करणारी व प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था

शुक्रवार, १९ जून, २०२०

टूथपेस्टमध्ये निळ्या, काळा, हिरवा किंवा लाल पट्टे का असतात?

आपण दररोज वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये निळ्या, काळा, हिरवा किंवा लाल पट्टे असू शकतो. या पट्टे त्या टूथपेस्टची रासायनिक रचना खालीलप्रमाणे दर्शवितात:

१. काळी पट्टी : ⬛अशी पट्टी असलेल्या टूथपेस्ट मध्ये फक्त रासायनिक घटक असतात. सहसा असे टूथपेस्ट वापराने टाळावे.

२. निळी पट्टी :🔷 ह्या मध्ये नैसर्गिक आणि औषधी घटक असतात.

३. लाल पट्टी: ♦️ह्या मध्ये नैसर्गिक आणि रासायनिक घटकांचे मिश्रण असते .

४ हिरवी पट्टी:📗 ह्या मध्ये सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.

छायाचित्र स्रोत: गूगल छायाचित्र

संकलन: सुमित रवि सरवदे

मंगळवार, १६ जून, २०२०

काळजातल्या काळजीच्या गोष्टी


#आमुची_Anniversaryनाहीय_आज_3O_डिसेंबरला_असते.
#फोटो_शेअर_करण्याचा_हेतू_हा_होता_की 

#जगू_की_मरु_याचा_नाहीय_भरवसा.
#म्हणून_व्यक्त_झालो_मी_जरासा....

या जगात कितीही संकटे आली तरीही शेवटी खंबीरपणे आपल्यासाठी आपल्यापाठी सावली बनून उभी असणारी अलौकिक शक्ती म्हणजे आपलं कुटूंब होय.

#संवाद #संबोध #संवेद #संयोगिता #सुमित_सरवदे

जगाशी भांडून कधी...
तर कधी गोड बोलून...
माणूस साधत असतो
स्वार्थ सडेतोड बोलून तर 
कधी तडजोड करून...
का कुणासाठी...?
.
जेंव्हा जग विरोधात जातं...
तेंव्हा हक्काचं पाठीशी जे उभे राहतात...
ते आपले प्रियजन,
म्हणजेच आपली फॅमिली,
कुंटूब,परिवार.
.
वडिलांच्या आकस्मिक जाण्यानं...
लहान बहिणीचीही साथ सुटल्यानं...
एकटा, एकाकी पडलेल्या माझ्या मनाला
आवरण्याचं आणि सावरण्याचं 
माझे मलाही अशक्य जेंव्हा झाले...
तेंव्हा माझे म्हणणारेही विरोधात गेले...
.
माझ्या आई,बहिण,आणि लहान भाऊ
यांचे साठी कांहीच करू शकत नसल्याची खंत
मी बऱ्याचदा माझ्या सुसाइट नोटमध्ये लिहायचो..?
मानसिक ताणतणाव इतका प्रचंड होता की,
जगण्यापेक्षा मरण सोईचं वाटू लागलं...
रोज नवनवे अशस्वी "#मृत्यूचे_प्रयोग" करू लागलो.
.
पण माझ्या नंतर आई अन् बहिण भावंडाचे काय?
हा प्रश्न त्या मरणापेक्षाही जास्त महत्वाचा वाटला.
शेवटी आई वडिलांचे संस्कार कामी आले.
वडिलांनी वाचनाचे वेड लावले होतेच,
मरणाचे १०१ टिप्सऐवजी आता जगण्यासाठी
 आवश्यक अशा वैचारिकतेची शोधमोहिम सुरू केली.
.
आयुष्याला पुरून उरेल एवढी 
शिदोरी पुस्तकांच्या रुपात वडिलांनी मला दिलेली होती...
.
परिस्थितीने बिघडवलेल्या मनाच्या अस्थिरतेला वडिलांच्या आदर्श विचारांनी घडविले.स्थिर केले.
.
आणि मग जगावे कुणासाठी तरी हा स्वार्थ आला.
.
कांही गोष्टी व्यक्त करण्यासारख्या असतात तर कांही मनातच विरून ठेवाव्या वाटणाऱ्या ...
.
पण जेंव्हा भावना अनावर होते.
तेंव्हा पुन्हा पुर्वीसारखी चिडचिड व्हायला लागायची...
सातत्य नव्हते कामात कसले तरीही,
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुसड वागायची...
.
मला समजून सांगणाऱ्यापेक्षा 
समजून घेणाऱ्याचीच खरी तर गरज होती...
.
जो तो वेडयात काढायचा अन् मी वेडा ठरायचो...
.
माझ्यातला आत्मविश्वास आता वरवर
कमी कमी होऊ लागला होता...
.
मला चित्रकला आवडायची...
गाणे म्हणायला आवडायचे...
भाषण करायलाही आवडायचे...
फोटोग्राफी, तसेच अभिनय करायलाही आवडायचे...
.
पण याचाही विसर पडावा, त्याविषयीची आवड कमी व्हावी यासाठी कुणी याच्यावर करणी तर केली नसेल...
.
जो तो आपआपल्या परीने तर्क लावत होता.
.
उध्वस्त झालेला मी... कोण स्विकारेल मला असे घरातल्यांना वाटू लागले.
.
आणि एक दिवस पाहुणे आले.
पहिलेच स्थळ.
.
मला घर नाही. दार नाही.
नोकरी नाही. कामधंदा नाही.
जमिन जुमला. शेतीवाडी नाही.
काही काहीच नव्हते.
.
पण माझ्याकडे दिवंगत माझ्या वडिल्यांचे सत्कर्म होते.
त्यांचे शुभाशिर्वाद होते. त्यांचे पुरोगामी विचार होते.
तिला माझे विचार आवडले.
जगाला न दिसणाऱ्या माझ्या श्रीमंतीनं तिला म्हणे अगदी दिपवले.

शब्दांकन : सुमित रवि सरवदे

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

छत्रपती शिवाजी महाराज : एक अख्यायिका.

छत्रपती शिवाजी महाराज : एक अख्यायिका.




फार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय
पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या... 

💠*छत्रपती* एक आख्यायिका का झाले... 💠


💠शिवाजी महाराजांचे 7 घोडे -💠

1- मोती
2- विश्वास 
3- तुरंगी 
4- इंद्रायणी
5- गाजर 
6- रणभीर
7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. 
महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.

छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. 
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. 

🙏मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले.🙏

जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.

💠छत्रपती शिवाजी महाराज एक 
भूगर्भ शाश्रज्ञ-💠


आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.

छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.  

जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही,  स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.

💠छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –💠



प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात 
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. 
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.


रायगड- 
राज्यभिषेक दिन 6 जून.

महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे. 

65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी 
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.

आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.

मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात 100/125 किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.

मुघलांचे घोडे 30/35 किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.

💠महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळ💠



८ मंत्री

३० विभाग (12 महाल व १८ कारखाने) 
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.

💠छत्रपती शिवाजी महाराज -💠



महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली.
म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.

वयाच्या 17 व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च 22000 कोटी. 
या गडावर महाराज 27  वर्ष राहिले. 

1982 साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. 

त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले. 
महाराज्यांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो.

© सुमित रवि सरवदे.

sarwadesumit77@gmail.com

👑Royal🦁Ratnapur👑

Sumit Ravi Sarwade.
Founder-President.

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

आपण वाढदिवस का साजरा करतो?

🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵

*आपण वाढदिवस का साजरा करतो?*
_______________🤗_____________
सिरीअसली का साजरा करतो आपण
आपल्याच जन्मदिवसाचा सोहळा?

करतो तर करतो .. ईतरांनीही त्यात सामील व्हावे, आपले अभिनंदन कौतुक करावे अशी अपेक्षा का करतो?

लग्नाचा वाढदिवस साजरा करणे समजू शकतो.
आणखी एक वर्ष लग्न टिकवले, आणखी एका वर्षाचा संसार झाला..
पण असा काय तीर मारला आपण, एखाद्या अमुक तमुक दिवशी जन्म घेऊन?
आणि त्या दिवसाला आज अमुकतमुक वर्षे होऊन..

बस्स जगलो एवढेच !

ते तर किडे मुंग्याही जगतातच की..

फरक ईतकाच,
ते किड्यामुंग्यांसारखे जगतात आणि आपण माणसांसारखे जगतो.

बास्स !

पण मुळात कधी कुठे केव्हा कसे जन्मावे हे आपल्या हातात असते का...
करायचेच झाल्यास आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडीलांचे अभिनंदन करणे जास्त योग्य नाही का..
शेवटी त्यांचेच तर प्रॉडक्ट एक वर्ष आणखी टिकले असते.

आता साजरा करणे आले म्हणजे पार्टी आली. केक आला. दारू आली.
जमलेच तर नाच आणि धिंगाणा आला.
या सर्वाचे फेसबूकवर फोटो टाकून त्यावर आणखी शेकडो लोकांचे कौतुकाचे आणि अभिनंदनाचे पोस्ट मिळवणे आले...

झालेय माझेही हे सारे करून..

मग एके वर्षी मी फेसबूकची सेटींग चेंज केली.
माझा वाढदिवस मी सोडून कोणालाच दिसणार नाही याची खात्री केली.

आणि मग त्या दिवशी मला समजले..

मी सोडून माझ्या बर्थ डे बद्दल कोणालाच पडली नव्हती ..

अगदी कोणालाच पडली नव्हती..

नॉट ए सिंगल विश .. ब्लडी नॉट ए सिंगल विश ..

दुसऱ्या दिवशी मी फेसबूक अकाऊंट डिएक्टीवेट केले ..

हे सगळे मला आजच का आठवले..

कारण पुढच्याच आठवड्यात माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे..

आणि तिची अशी अपेक्षा आहे की मी त्या दिवशी सुट्टी टाकावी.. जे मला वर्कलोडमुळे जमणे अवघड आहे !

काय सांगू आता बॉसला..
ऑफिसच्या मिटींग पेक्षा माझी आजची डेटींग महत्वाची आहे.
जिच्याबरोबर सेटींग झालीय ती महत्वाची आहे.

एवढी हिंमत कदाचित होणार नाही सांगायची ..
पण ऑफिसला दांडी जरूर मारणार ..

उडत गेले ऑफिस आणि तेल लावत गेला बॉस,
तिच्यासाठी मी एवढे जरूर करणार ..

का माहितेय ..

कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला..

एक तिचाच तर फोन आला होता Happy Birthday 🎉🎂 Sumit 💝 म्हणणारा ...

🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵🥰🏵

🌼( मायबोलीवरून साभार )🌼

संकलन: सुमित सरवदे

रॉयल रत्नापूरच्या उभारणीसाठी


                      👑रॉयल🦁रत्नापूर👑
___________________________________________
_रत्नापुरच्या सर्वांगिक विकासासाठी जात-पातीच्या राजकारणाला आणि असे राजकारण करणाऱ्यांना किंमत न देता ... चांगले कार्य करणाऱ्यांचे कौतुक आणि हिंमत देणाऱ्या आपल्या सारख्या देवमाणसांच्या कृपा आशिर्वादाने आपण रॉयल रत्नापुर ची मुहूर्तमेढ रोवितो आहोत .

_पुर्वीपासूनच आपले सत्कार्याला सहकार्य लाभले आहेच . असेच निरंतर लाभो एवढीच माफक अपेक्षा बाळगतो.

_आपल्या विचारांचा पाईक आणि सृजनशिल मनांच्या गळ्यातला ताईत होण्याहेतू आपला सस्नेह आशिर्वाद पुरेसा आहे.

_माझे वडिल कै.रवी अजिनाथ सरवदे यांचे कार्यकर्तृत्व जसे आपणा सर्वांच्या पाठबळांमुळेच नावारूपाला आले .

_असेच भविष्यकालीन माझ्या स्वप्नपूर्तींसाठी आपली मोलाची खंबिर साथ हवी आहे.

_आपल्या प्रेमपुर्व सहकार्याचा अभिलाषी .

                          आपलाच स्नेही,
___________________________________________
                  🏵सुमित(भाऊ)सरवदे🏵

पक्षाचा कार्यकर्ता

*🙏पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या  व समाजाच्या हितासाठी  एक 'समाजसेवक' बना.*

👇👇👇👇👇👇👇
● गावात वीज आहे का.?
● गावात किती दिवे चालू आहेत.?
● गावात किती दिवे बंद आहेत.?
● गावात रस्ते कसे आहेत.?
● गावात त्यांची डागडुजी होते का.?
● सांडपाणी गटर व्यवस्था आहे का.?
● सार्वजनिक शौचालय आहे का.?
● गावात आठवडा बाजार आहे का.?
● पिण्याच्या पाण्याची सोय आहे का.?
● पाणी मुबलक सर्वांना मिळते का.?
● घरोघरी पाण्याचे नळ आहेत का.?
● गावात येणारे पाणी शुद्ध आहे का.?
● गावात शाळेची व्यवस्था आहे का.?
● शाळेसमोर मैदान व गार्डन आहे का.?
● गावात समाज मंदिर आहे का.?
● गावात व्यायाम शाळा आज का.?
● ती व्यायाम शाळा कार्यरत आहे का.?
● गावातीळ रस्ते कसे आहेत.?
● गावाचे ध्येय धोरण काय आहे.?
● ते आपण सर्व पाळतो का.?
● मुलांना लसीकरण वेळेवर होते का.?
● गावात दवाखाना आहे का.?
● आरोग्य विषयक शिबिरे घेतात का.?
● सांस्कृतिक कार्यक्रम होतात का.?
● गरीब मुलांचे शिक्षण कसे होते.?
● त्यांच्यासाठी काय प्रयोजन आहे.?
● जेष्ठ नागरिकांचा सन्मान होती का.?
● अकस्मात घटनेत मदत मिळते का.? 
● कार्यासाठी सर्व एकत्र येतात का.?
● गावात सरपंचाचे लक्ष आहे.?
● ग्रामसेवक योजना आणतात का.?
● नागरिकाला त्याचा फायदा होतो का.?

*👉 गाव ही संघटना नाही गाव हा पक्ष नाही, गाव हे मानवतेचे महान मंदिर आहे, जेथे एकोपा जोपासला जातो.*
*👉 मी कार्यकर्ता नाही, समाजाचा एक प्रमुख घटक आहे.* 
*👉 माझे कर्तव्य हे असेल माझा गाव माझा स्वर्ग आहे, तो स्वर्गच राहण्यासाठी मी माणूस म्हणून कधी या गोष्टींचा विचार केला का..?*

*🙏मग विचार करा, नक्की बदल घडेल.🙏*

*🙏पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या व समाजाच्या हितासाठी गावाचा एक 'समाजसेवक' बना.*

Security Supervisor का क्या काम होता है

Security Supervisor का क्या काम होता है इस पेज पर Security Supervisor का क्या काम होता है जानकारी दी गई है। यदि आप ने अभी तक सिक्योरिटी सुपर...